बालविवाहाबाबत केंद्राकडून धक्कादायक आकडेवारी जाहीर; झारखंडमध्ये सर्वाधिक बालविवाह

थिंक टँक स्पेशल
बालविवाहाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार झारखंडमध्ये बालविवाहाची टक्केवारी सर्वाधिक ५.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. १८ वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण १.९ टक्के आहे. देशात सर्वात कमी म्हणजे शून्य बालविवाह केरळमध्ये आहे.
झारखंडमध्ये होणारे बालविवाहांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त बालविवाह हे ग्रामीण भागात तर उर्वरीत शहरी भागात होत असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात २१ वर्षांपूर्वी महिलांचे विवाह होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारी नुसार ५४.०९ टक्के मुलींचे विवाह हे २१ वर्षांच्या आत होतात. झारखंडमध्ये हेच प्रमाण ५४.६ टक्के एवढे आहे. तर देशात २९.५ टक्के मुलींचे विवाह २१ वर्षांच्या आत होत आहेत.
लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पुर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जात असे अज ही काही प्रमाणात असे प्रकार होतानी अढळून येतात.
बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.. या सा्ऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.
लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधी आपले बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात गमवावे लागते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच समाजाला काळिमा आहे.



